नवी दिल्ली : इराण आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने खबरदारीचा उपाय म्हणून १६ विमाने अन्य मार्गाने वळविली आहेत. इस्रालयच्या हल्ल्यानंतर इराणने हवाई हद्द तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एअर इंडियाने हा निर्णय घेतला. विमान प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्या अंतर्गत प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहचता यावे, यासाठी खासगी विमान कंपन्यांची सेवा घेण्यात येत आहे. हॅथ्रो ते मुंबई, न्यूयॉर्क ते दिल्ली, न्यूयॉर्क ते मुंबई ही विमाने व्हिएन्ना, शारजाह आणि जेद्दाहकडे वळविली आहेत.
Fans
Followers